बाजीराव दराडे यांनी केली आदिवासी बांधवांची दिवाळी गोड !
बाजीराव दराडे यांनी केली आदिवासी बांधवांची दिवाळी गोड !
अकोले - आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, या उदात्त हेतूने माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी अकोले तालुक्यातील सहा हजार कुटुंबांना मिठाई वाटप केली आहे. बाजीराव दराडे यांच्या या दातृत्ववादी उपक्रमाचे अकोले तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
शिवसेनेचे नेते असलेले बाजीराव दराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी निमित्त मिठाई वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवित आहे.यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील नागरिकांची भातपिके सडून गेली आहेत.त्यामुळे या आदिवासी बांधवांची दिवाळी यंदा अडचणीत सापडली आहे.या सर्व परिस्थितीचा विचार करता बाजीराव दराडे यांनी आपल्या समशेरपूर गटासह तालुक्यातील इतर ही ठिकाणी मिठाई वाटपाचा निर्णय घेतला.बाजीराव दराडे यांच्या पत्नी सुषमा दराडे या समशेरपूर गटाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. तर बाजीराव दराडे या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिले आहेत.त्यामुळे या गटापासून दराडे यांनी मिठाई वाटपास शुभारंभ केला.आपल्या स्वतःच्या गटात पाच हजार पेक्षा जास्त मिठाईचे बॉक्स त्यांनी आदिवासी बांधवांना वितरित केले.दराडे यांच्या या दानशूर पणामुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हलकेसे का होईना हास्य उमलले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.या मिठाई बॉक्समध्ये लाडू,मिठा वडा, शंकरपाळी, सोनपापडी यासारखे पदार्थ ठेवण्यात आले आहेत.समशेरपूर गटात जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी घरोघरी जाऊन मिठाई वितरित केली.तर बाजीराव दराडे यांनी देखील तालुक्यातील इतर ठिकाणी व आपल्या मित्र परिवारास ही मिठाई वितरित केली आहे.दराडे दाम्पत्याच्या या सामाजिक उपक्रमाचे अकोले तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
अकोले - आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, या उदात्त हेतूने माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी अकोले तालुक्यातील सहा हजार कुटुंबांना मिठाई वाटप केली आहे. बाजीराव दराडे यांच्या या दातृत्ववादी उपक्रमाचे अकोले तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
शिवसेनेचे नेते असलेले बाजीराव दराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी निमित्त मिठाई वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवित आहे.यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील नागरिकांची भातपिके सडून गेली आहेत.त्यामुळे या आदिवासी बांधवांची दिवाळी यंदा अडचणीत सापडली आहे.या सर्व परिस्थितीचा विचार करता बाजीराव दराडे यांनी आपल्या समशेरपूर गटासह तालुक्यातील इतर ही ठिकाणी मिठाई वाटपाचा निर्णय घेतला.बाजीराव दराडे यांच्या पत्नी सुषमा दराडे या समशेरपूर गटाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. तर बाजीराव दराडे या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिले आहेत.त्यामुळे या गटापासून दराडे यांनी मिठाई वाटपास शुभारंभ केला.आपल्या स्वतःच्या गटात पाच हजार पेक्षा जास्त मिठाईचे बॉक्स त्यांनी आदिवासी बांधवांना वितरित केले.दराडे यांच्या या दानशूर पणामुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हलकेसे का होईना हास्य उमलले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.या मिठाई बॉक्समध्ये लाडू,मिठा वडा, शंकरपाळी, सोनपापडी यासारखे पदार्थ ठेवण्यात आले आहेत.समशेरपूर गटात जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी घरोघरी जाऊन मिठाई वितरित केली.तर बाजीराव दराडे यांनी देखील तालुक्यातील इतर ठिकाणी व आपल्या मित्र परिवारास ही मिठाई वितरित केली आहे.दराडे दाम्पत्याच्या या सामाजिक उपक्रमाचे अकोले तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा