निळवंडेतून पिण्याचे पहिले आवर्तन सुटले !

निळवंडेतून पिण्याचे पहिले आवर्तन सुटले !

अकोले- निळवंडे धरणातून रब्बी हंगामातील पिण्याचे पाण्याचे पहीले आवर्तन आज शुक्रवारी सकाळी ६:३० वा १२०० क्युसेक्स वेगाने प्रवरा पाञात सोडण्यात आले आहे.
       भंडारदरा पाणलोट व लाभक्षेञात चालु वर्षी भरपूर पाऊस झाल्याने लाभक्षेञात पाण्याची समाधानकारक परिस्थिती होती. सद्या रब्बी हंगाम सुरु असुन भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांसाठी पिण्यासाठी म्हणून रब्बी हंगामातील पहीले पिण्याचे पाण्याचे बिगर सिंचन आवर्तन आज शुक्रवार  दि ४/१२/२०२० रोजी सकाळी ६:३० वा निळवंडे धरणातून १२०० क्युसेकने  सोडण्यात आले आहे.
               हे आवर्तन सोडतेवेळी निळवंडे धरणाची पाणीपातळी ६४८.०० मी व पाणीसाठा ८२८५ दलघफू आहे.हे आवर्तन ४ ते ५ दिवस सुरु राहणार असुन या आवर्तन काळात ४०० ते ४५० द.ल.घ.फु.पाणीसाठा खर्च होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई

एका पदाधिकऱ्याची लवकरच होणार हकालपट्टी !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !